✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक
आल्लापल्ली:-आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (आयटक) अहेरी तालुका तर्फे ग्रामपंचायत सभागृह आलापल्ली येथे मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या उद्धघाटनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष काँ. विनोद झोडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सप्टेंबर 2018 पासून केंद्र शासनाने मोबदल्यामध्ये कोणती वाढ केली नसून कोरोनाच्या काळात आशा वर्कर व गटप्रवर्तक कडून महत्त्वाचे काम करून घेतल्या नंतर सुद्धा कोणताही मोबदला दिलेला नाही. परंतु कोरोना नंतर ज्या कामाचा मोबदला मिळत असे त्या कामाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये मोफत मध्ये शक्तीने राबवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मानधन वाढीकरता केंद्र शासनाचे विरोधात मोठा लढा लढणे गरजेचे आहे. रिटायरमेंट नंतर ५ लाख रुपये ग्रॅज्युटी, १० हजार रुपये मासिक पेन्शन व २ हजार रुपये दिवाळी बोनस आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मिळावा तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा याकरिता आपल्या हक्कासाठी लढ्यामध्ये सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन कॉ. विनोद झोडगे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी पत्रकार प्रशांत डांगे,संघटनेच्या कार्याधक्ष कॉ विद्यादेवी येजुलवार,तालुका अध्यक्ष रुक्षसार शेख,वैशाली सोनटक्के,उमादेवी समुद्रालवार,पार्वती दुर्गे उपस्थित होते.
आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या चळवळीला कमजोर करण्याकरता मानधनाची तफावत ठेवून द्वेष निर्माण करण्याचा घाट महायुती सरकारने केला. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असून राज्य शासनाला भविष्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार व राज्य सरकार नवीन कामगार कायदे लागु करत असून त्यामधून कामगारांना किंवा कामगार चळवळीला मोठे धोके उत्पन्न होणार असून त्याविरुद्ध केंद्र – राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरुद्ध कामगारांनी आयटक चे नेतृत्वात संघटितपणे लढा लढणे गरजेचे आहे.
येत्या 27 व 28 एप्रिल 2025 रोजी आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना संलग्न आयटक चे राज्य अधिवेशन गोंदिया जिल्हा येथे आयोजित केला असून पहिल्या दिवशी होणाऱ्या विशाल रॅली मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे कार्याधक्ष विद्यादेवी येजुलवार यांनी केले.
सदर मेळाव्याचे संचालन तालुका सचिव संगीता चांदेकर तर आभार राधा पुलुरवार यांनी मानले यावेळी तालुक्यातील शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

