संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-विमानस्थळ स्थापन करण्यासाठी पाचसे एकर सुपिक जमिन शेतकऱ्यांची कोणतीही विचारणा न करता शासन शेतकऱ्यांची जमीन बळजबरीने अधिग्रहन करीत आहे त्यामुळे पारडी – पुलकल परिसरातील शेतकरी जनआक्रोश करून

दि. २८ एप्रिल पासुन शरद पाटिल ब्राम्हिणवाडे यांच्या नेतृत्वात पुलकल फाटा जवळ जवळपास सहा गावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. शासन व प्रशासनाने आजपर्यंत कोणतीच दखल घेतली नाही. अश्या परिस्थितीत राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिपक इंगळे लातुर , रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर ‘ राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय गंडाटे , राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयंत गेडाम , बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हासचिव प्रमोद राऊत , रिपाईचे खेमचंद हस्ते , तुषार रामटेके आदिनी उपोषण मंडपाला भेट देऊन जाहीर पाठींबा दिला व दिपक इंगळे यांनी मार्गदर्शन केले.

