संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-लोकसभा विपक्ष नेते राहुलजी गांधी तसेच खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेत जातनिहाय जनगणनेची व आरक्षणावरील 50% ची मर्यादा हटवून जनसंख्येनुसार आरक्षणाची प्रखर मागणी केली होती. नुकताच केन्द्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी ओबीसी समाज संघटना तालुका देसाईगंज यांच्या वतीने अभिनंदन सोहळा व ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी मिरवणूकीत सहभागी होऊन सत्कार स्वीकारून सभेला मार्गदर्शन केले.तर भाजपाचे माजी आमदार कृष्णाजी गजबे म्हणाले की भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जातनिहाय जनगणना करण्याचे ठरविले आहे. याचा फायदा बहुजनांना होणार आहे. अश्या चांगल्या निर्णयाचे भाजपातर्फे सर्वत्र स्वागतच होत आहे.
यावेळी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र रामदासजी मसराम, अध्यक्ष ओबीसी समाज संघटना लोकमान्यजी बरडे, माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी माजी बीजेपी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जेष्ठ नेते नानाजी नाकाडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, माजी सभापती परसरामजी टिकले, माजी उपसभापती नितीनजी राऊत, माजी सभापती महीला व बालकल्याण सौ.रोशनीताई पारधी, माजी सभापती सौ.प्रभाताई ढोरे, सरपंच सौ.अपर्णाताई राऊत, सरपंच सौ.अर्चना ढोरे , तालुका संयोजीका सौ. कल्पना कापसे, अध्यक्ष महीला समिती सौ.शेवंताताई अवसरे, सौ.वनिताताई नाकतोडे, सौ.वैष्णवीताई आकरे , सागर वाढई संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते , मोठ्या संख्येने ओबीसी बांधव व महीला उपस्थित होते.

