संपादक
मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली जिल्हयात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा , प्राणहिता , गोदावरी नदया असुन पावसाळ्यात अनेक नद्यांना पुर येतो व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेताचे अथोनात नुकसान होते. त्यामुळे नदि काठावरचे शेतकरी उन्हाळी फसल लावतात परंतु गोसीखुर्द प्रकल्प व रेगडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे दुबारा पेरणी करणारे शेतकरी पुन्हा शंकटात सापडतात त्यामुळे शासनाने प्रकल्पातुन पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी घेऊन व इतर मागण्या सहीत जिल्हा कांग्रेस तर्फे दि. ५ एप्रिल २०२५ रोजी वैनगंगा नदि पात्रात लखलखत्या उन्हात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा ईशारा पत्रकार परिषदेत आमदार रामदास मानराम यांनी दिलेला आहे.इतर मागण्या अश्या गडचिरोली विमानस्थळासाठी सुपिक जमीन अधिग्रहण न करता शासकिय वा वनविभागाच्या जमीनीचा उपयोग करावा , भेंडाळा MIDC करीता जमीन अधिग्रहण करतांना सदर परिसरातील शेतकऱ्यांसी चर्चा करावी , कोटगल बॅरेज करीता अधिग्रहण केलेल्या जमीनाचा शेतकऱ्यांना मोबदला त्वरीत देण्यात यावा , मनेरगा अर्तगत केलेल्या कामाची मजुरी मंजुरांना त्वरीत देण्यात यावी , शेतकऱ्यांना कर्जमाफी त्वरीत करावी आदि मागण्याचे निवेदन शासनाला पाठविण्यात येणार आहेत.
सदर पत्रकार परिषदेला आमदार रामदास मेशराम आरमोरी विधान सभा क्षेत्र , कांग्रेसचे जेष्ठ नेते पंकज गुंडेवार ,कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे ,कांग्रेसचे वसंत राऊत , कांग्रेस महिला आघाडीच्या ॲड. कविता माहुरकर , मिलिंद खोब्रागडे , रजनीकांत मोटघरे , जावेद खॉन , सागर वाढई , भाग्यवान मेश्राम , रुपेश टिकले , दिवाकर निसार , सुधिर बांबोळे , शतिश विधाते , प्रमोद भगत ‘ उत्तम ठाकरे , नेताजी गावतुरे , प्रतिक बारसिंगे आदि सहीत कांग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

