संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-दि. ९ जुन च्या चक्रीवादळाने गडचिरोली तालुक्यांतील मौशीखांब येथील शेतकरी खुशाल दाऊजी उंदिरवाडे यांच्या शेतातील नव्यानेच लावलेले सौर उर्जाचे खांब वादळी पाऊसाने वाकून गेलेत व सौर उर्जाच्या प्लेटा फेकल्या गेल्यामुळे सदर शेतकऱ्याचे लोखोचे नुकसान झालेले आहे.
चक्रीवादळामुळे उंदिरवाडे यांच्या शेतातील सौर ऊर्जाची एवढी मोठी नुकसान होवूनही व तलाट्याकडे तक्रार करून सुद्धा अजुनही चौकशी करण्यात आलेली नाही.
चक्रीवादळामुळे सौर ऊर्जेच्या प्लेटा व एंगल चे लाखोचे नुकसान झाले असुन शासनाने नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी खुशाल उंदिरवाडे यांनी केलेली आहे.

